काल झालेल्या परिते ग्रामसभेत पाणीपुरवठा विहिरीच्या कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित केला असता, ग्रामपंचायतीकडे संबंधित विहिरीची कागदपत्रे उपलब्ध नाहीत, असे सरपंचांनी उत्तर दिले.
त्याहून गंभीर बाब म्हणजे, “गावाला गेल्या ४० वर्षांपासून याच विहिरीतून पाणी घेतले जात आहे” असेही सांगण्यात आले.
मग प्रश्न साधा आहे — ४० वर्षांपासून ग्रामपंचायत या विहिरीतून पाणी घेत असेल, तर संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचा वापर कोणत्या कायदेशीर परवानगीने झाला? त्याचा मोबदला अथवा नुकसानभरपाई दिली का? आणि याची अधिकृत कागदपत्रे कुठे आहेत?
जर आजही ग्रामपंचायतीकडे विहिरीची कागदपत्रे नसतील, तर गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कोणत्या आधारावर चालला? हा गंभीर प्रश्न आहे.
गावाच्या पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत विषयातही कागदपत्रे उपलब्ध नसणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
४० वर्षांचा इतिहास सांगून प्रश्न संपत नाही; उलट त्या ४० वर्षांचा हिशोब आणि कागदपत्रे जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
जनतेला स्पष्ट, पारदर्शक आणि कागदोपत्री उत्तर मिळालेच पाहिजे!










