सर्वांत मोठ्या दिव्यांग घटकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?
औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव आजही विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना व निधीची तरतूद असतानाही प्रत्यक्ष लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दिव्यांगांना घरकुल, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय राशन कार्ड तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मिळणारा ५ टक्के दिव्यांग निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित योजनांचा लाभ तातडीने द्यावा, तसेच योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
“दिव्यांग हा समाजातील दुर्लक्षित घटक न राहता त्याला शासनाच्या योजनांचा हक्काचा लाभ मिळाला पाहिजे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्यावेळेस ज्येष्ठ दिवांग तुराब खाँ पठाण, समाज सेवक शेख मोबिन मुक्तार, शेख निसार शेख बबलू शेख सलीम शेख तवक्कल शेख अब्दुल शेख आताऊल्ला व अन्य असे दिव्यांग बांधव त्यावेळेस उपस्थित होते.












