भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या बातमीने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला माहित होतं की, त्यांच्या सारखं परत कोणी होणार नाही. व्यवसाय क्षेत्रातील सर्वात दिग्गज नाव आणि एक उदार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.
Discussion about this post