जळगाव प्रतिनिधी/कैलास देशमुख
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदार संघात यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. या लढतीत प्रमुख उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे (भा.ज.पा.) आमदार श्री मंगेश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार श्री उन्मेष पाटील यांची कणखर जणावर लढत रंगली होती. याशिवाय, माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री राजीव देशमुख यांचा पाटील यांना पाठिंबा मिळाला होता, ज्यामुळे लढत अधिकच रंगत गेली होती.
पण मतदारसंघातील जनतेने मोठ्या प्रमाणावर श्री मंगेश चव्हाण यांच्या बाजूने कौल दिला. विकासाच्या कामांवर आधारित त्यांची लोकप्रियता आणि प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीला धावून येणारा त्यांचा कार्यकर्ता म्हणून ठळक ठरलेला चेहरा यामुळे चाळीसगाव मतदार संघातील जनतेने त्यांना ८५६५३ मतांचा लीड दिला.
विजयानंतर आयोजित सभेत श्री मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले, “चाळीसगावच्या प्रत्येक भागाचा विकास हा माझा ध्यास आहे. येणाऱ्या काळात आम्ही या परिसरात पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण करू. आपला विश्वास ठेवल्याबद्दल मी मतदारांचा आभारी आहे आणि यापुढे चाळीसगावला एक उज्ज्वल भवितव्य देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
श्री मंगेश चव्हाण यांचा विजय हा चाळीसगावच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा प्रतीक ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुक्याचा विकास होईल, असे मत अनेक प्रगल्भ विश्लेषक आणि स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे
Discussion about this post