
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे ची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आली आहे. दोन कोटीच्या खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या चाटे वर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे.केज कोर्टाने सुरुवातीला लातूर कारागृहाची मागणी फेटाळली होती, मात्र सुरक्षा कारणास्तव ही मागणी मान्य करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात चाटेने ३५ वेळा फोन करून खंडणीची मागणी केली होती. फोनवरील पुरावे महत्त्वाचे मानले जात असून, तपासासाठी जप्त मोबाईल प्रयोग शाळेत पाठवले आहेत, चाटे ला कोणापासून धोका आहे याचा तपास सुरू आहे.
Discussion about this post