नायगांव तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी चे केले आवाहन- संगणक परिचालक संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष गणेश चोंडे….
नायगांव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगांव :- शासनाने अनेक वेळा दिलेले आश्वासन न पाळल्याने मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवारी 26 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नायगाव तालुक्यातील अनेक संगणक परिचालक यांनी 25 तारखेला निघुन 26 तारखेला मुंबईत येण्याचे आव्हान नायगाव परिचालक संघटनेने केला आहे…
यावलकर समितीने शिफारस केल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधानुसार संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे .जर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यास वेळ लागत असेल तर किमान विस हजार रुपये मासिक मानधन वाढ देणे या दोन प्रमुख मागण्यासाठीच 21 फेब्रुवारी ला धरणे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन हजार रुपयाची वाढ करून एकूण दहा हजार रुपये देण्याचे जाहिर केले होते.पण ग्रामविकास विभागाने जुन महिन्यात एक जिआर निर्गमित केला तो पण संगणक परिचालक यांच्या विरोधात अगोदर च्या कंपनी चा करार संपुष्टात आणुन आय टी महामंडळ यांच्याकडे देण्यात आला परंतु या आय टी महामंडळ याने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प चालविण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे…
अगोदर च्या कंपनी चा करार संपुष्टात आल्याने नव्याने संगणक परिचालक यांना नियुक्ती करणे गरजेचे होते पण एक जुलै पासुन कोणाचीही नियुक्ती केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचबरोबर मागील कोणतीही मागणी न करता एक प्रकारे छळ च करत असल्याचे संगणक परिचालक बोलून दाखवत आहेत. ना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा दिला ना किमान वेतन लागू केले…
त्यामुळे राज्य संगणक परिचालक संघटना यांनी 26 ऑगस्ट पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नायगाव तालुक्यातील संगणक परिचालक यांनी सर्व तयारीनिशी मुबंई ला येण्यासाठी संगणक परिचालक संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष गणेश चोंडे टाकळीकर यांनी केले आहे…
यावेळी संगणक परिचालक तालुकाध्यक्ष गणेश चोंडे, उपाध्यक्ष रामेश्वर पवार, सचिव तिरुपती जाधव, गजानन कदम, पांडुरंग बनसोडे, नागेश जाधव, शैलेश जाधव, गुलाब वानखेडे, दिपक गजभारे, संभाजी पांचाळ, बाजीराव ढगे, आनंदा कदम, हणमंत उपासे, इत्यादी ची उपस्थिती होती.
कोणत्याही आश्वासनावर माघार घेण्यात येणार नाही तसेच शासनाने निर्णय दिल्या शिवाय आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही. असा पवित्रा राज्य संघटनेने घेतला आहे….
चौकट :- आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिक काम करत असताना शासनाने संगणक परिचलकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागण्या संगणक परिचालकांच्या न करता निधी नसल्याचे मुख्यमंत्री सांगतात तर दुसरीकडे युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत ला डेटा ऑपरेटर म्हणून नियुक्ती देत आहे. हे पद सहा महिन्यासाठी असल्याचे सांगत आहेत तरीही दोन्हीही ऑपरेटर यांच्यामध्ये स्पर्धा होऊन विनाकारण सरकार संगणक परिचालक यांचा छळ केला जात असल्याचे बोलल्या जात आहे…..
Discussion about this post