प्रतिनिधी – अमोल कदम
लातूर तालुक्यातील खंडापूर येथे मागील सहा दिवसांपासून वारकऱ्यांचा महाकुंभमेळावा सुरू असून राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत आहेत. या वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून दररोज लाखो भाकऱ्यांचे संकलन केले जात आहे.
याच उपक्रमाअंतर्गत निलंगा तालुक्यातून सुमारे सव्वा लाख भाकऱ्या पाठविण्यात आल्या. तसेच निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावातून ५५५५ भाकऱ्या, शेंगदाण्याची चटणी व मिरचीचा ठेचा देण्यात आला. गावातील प्रत्येक घरातून ५ ते ११ भाकऱ्या संकलित करून त्या मारुती मंदिर येथे जमा करण्यात आल्या व नंतर खंडापूर येथील महाकुंभमेळ्यासाठी पाठविण्यात आल्या.
या उपक्रमासाठी ज्ञानेश्वर ढाबळे, माजी सरपंच श्रीकांत साळुंखे, उपसरपंच बब्रुवान जाधव, विनायक काटवटे, बालाजी काळे, शिवाजी जाधव, माधव दिवे, भगवान भांगे यांच्यासह अनेक वारकऱ्यांनी परिश्रम घेतले.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावागावातून होत असलेले भाकरी संकलन हे सामाजिक एकात्मतेचे व भक्तीभावाचे प्रतीक ठरत आहे.






