आज दि. 1 मार्च रोजी कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आमदार श्रीमती संजना जाधव यांनी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे सुरू करण्यासाठी तसेच ती गावागावात गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुलभ दळणवळणाची सुविधा निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे संजना जाधव म्हणाल्या.
पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी, उत्पादन बाजारपेठेत पोहोचवताना येणारे प्रश्न आणि आपत्कालीन परिस्थितीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून कार्यपद्धती अधिक सोपी, सुलभ आणि वेळबद्ध करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
गावनिहाय प्राधान्यक्रम, तांत्रिक मानके, निधी नियोजन आणि कामांच्या दर्जाबाबत स्पष्ट दिशा निश्चित करण्यात आली.
बळीराजाच्या श्रमाला योग्य सन्मान देत, शेतापर्यंत मजबूत रस्ते आणि विकासाची वाट घडविण्याचा निर्धार या बैठकीतून करण्यात आला.






