तेल्हारा शहराजवळील गुणवंत महाराज कॅनॉल परिसरात दुपारी सुमारे १२ वाजता भीषण अपघात घडला.
मालेगाव बाजार येथील तीन अल्पवयीन मुले दुचाकीने तेल्हाऱ्याकडे येत असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रक (क्रमांक MH 30 BD 7158) यांच्याशी जोरदार धडक झाली.या भीषण अपघातात गणेश अतुरकर (१७), साई वैष्णव (१३) आणि दर्शन वैष्णव (१६) या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.



