
सारथी महाराष्ट्राचा :प्रतिनिधी नाना साबळे धोंदलगाव :-शिवना टाकळी मध्यम प्रकल्प हा पाथरी भायगाव व धोंदलगाव येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पण.. दि. 9 फेब्रुवारी निघालेले हे पाणी मनूर मध्ये आले खरे तेथे पूजाही करण्यात आली पाण्याची.. पण एक मार्च चालू झाला तरीही.. अजून पाथरी शिवार व धोंदलगाव शिवार भायगाव शिवार येथे पाण्याचा थेंबही नाही.. मग पाणी मुरते कुठे ते मुरते ढेकू नदी तील बाबुळगाव शिवारात. आज जिथे पाण्याची गरज.. तिथे तर पाणी नाहीच आणि हे पाणी ढेकूच्या नदीपात्रात सोडल्या गेले किंवा फुटलंय यावर प्रशासनाचे लक्ष नाही तरी धोंदलगाव भायगाव पाथरी या गावातील शेतकऱ्यांचा शासन प्रणालीवर… तीव्र शब्दात निषेध करताना दिसून येत आहे… तरी येथील सर्व शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे की विश्वास पाटील लिखित कादंबरी झाडाझाडती तील वाक्य (विकासाचं नारळ फोडण्यासाठी आमची डोकी वापरल्या गेली पण खोबरं तर तुम्हाला मिळालं आम्ही साधं पाण्यासाठी….) जरा आमच्याकडेही लक्ष द्यावा झाडाझडती करू नका या आमच्या शेतातून गेलेले पाट किंवा चारी असो तिचा राहिलेला मोबदलाही ही लवकरात लवकर दयावा.. व पाणी आमच्या शेतात.. लवकरात लवकर.. येऊ द्यावे… अशा.. मागण्या जोर धरू लागल्या आहे. यात हे प्रश्न मार्गी लागले नाही जनआंदोलन हे उभे राहणार… असे या गावातील शेतकरी वर्ग बोलताना दिसून आले



