प्रतिनिधी/आलेगाव
पातुर तालुक्यातील आलेगाव (जि.अकोला) येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या पुढाकारातून २८ फेब्रुवारी रोजी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमास गावातील मुस्लिम बांधवांसह विविध धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळेस सर्वधर्मीय सौहार्दाचा संदेश देण्यात आला.ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि परस्पर दृढ विश्वास करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.सध्याचे काळात सामाजिक ऐक्य टिकवुन ठेवणे गरजेचे असून, त्यासाठी संवाद आणि सहकार्याची भूमिका महत्वाची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
निलेश कापकर यांनी गावात बंधुभाव, शांतता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक बळकट व्हावी या उद्देशाने ईफ्तार पार्टीचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत आनंददायी व उत्साहपूर्ण होते.विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन सहभागी झाल्याने गावात एकतेचे चित्र पाहावयास मिळाले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नाजीम भाई,राजा व साजिदभाई,मंगल तेलगोटे,वैभव काळदाते, चेतन काठोळे ,संतोष काठोळे,वैभव मुर्तडकर आदीनीं विशेष सहकार्य केले.या उपक्रमामुळे आलेगावात सर्वधर्मीय एकोप्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.सामाजिक सलोखा वाढविणार्या अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








