पनवेल प्रतिनिधी:- पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७८ व्या वैकुंठ गमन सोहळ्याचा भक्तिरसात रंगलेला बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक पूजा, पालखी सोहळा, टाळ–मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या जयघोषाने संपूर्ण कळंबोली परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा कळंबोली येथील हनुमान मंदिर, एलआयजी -१, सेक्टर -२ या ठिकाणी साजरा करण्यात आला. दरवर्षी माथाडी जुनी टोळी नं-१ गट जी ४२ ते ५१ यांच्या कडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या सोहळ्याचे ३६ वे वर्ष आहे.
संत तुकाराम बीज च्या निमित्ताने गुरुवार २६/२/२०२६ ते गुरुवार ५/३/२०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व पंचमवेद संत तुकाराम गाथा पारायण आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम बीज निमित्ताने सकाळ पासूनच भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यात सकाळी १० ते १२ भागवताचार्य ह.म.प. मुकुंद महाराज चौधरी, आळंदी देवाची यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमण व काल्याचे किर्तन. दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत संत तुकाराम महाराज लिखित ओव्यांचा कार्यक्रम, ३ ते ५.०० तुकाराम महाराज रथाची मिरवणूक काढण्यात येणार व संध्याकाळी ६ ते ९.०० महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा मोठ्या प्रमाणात परिसरातील वारकरी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला या वेळी गरुडाची प्रतिकृती बनवून यात संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा ठेवून नामस्मरणात हा सोहळा पार पडला.
या सोहळ्याचे आयोजन श्री गणेश प्रासादिक हनुमान उत्सव व बिजोत्सव मंडळ, कळंबोली,से. नं. २, ता. पनवेल, जि. रायगड व जुनी टोळी ४२ ते ५१ सर्व कामगार यांनी केले होते.








