• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा – सुधीर भद्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

by
March 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
100
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही थकबाकीदार शेतकऱ्यांप्रमाणे न्याय मिळावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा **भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

RelatedPosts

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय नियमित कर्जदार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे भद्रे यांनी नमूद केले.

यापूर्वीच्या कर्जमाफीमध्येही थकबाकीदार शेतकऱ्यांची थकबाकी माफ करण्यात आली होती, मात्र नियमित कर्जदारांना मर्यादित स्वरूपात सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. सध्याच्या निर्णयामुळे त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे नेहमीच पुरेसे पैसे असतात असे नाही. मात्र गावातील सेवा सोसायटीची वसुली कमी होऊ नये आणि आपल्या कुटुंबावर कर्जाचा डाग राहू नये या प्रामाणिक भावनेतून अनेक शेतकरी कष्ट करून वेळेवर कर्जफेड करत असतात. सहकार क्षेत्रातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, जिल्हा सहकारी बँका आणि संपूर्ण सहकार व्यवस्थेचे अर्थकारण हे अशाच प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांवर उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर भविष्यात अनेक शेतकरी कर्ज थकविण्याचा मार्ग स्वीकारतील आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार व्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी अशोक सब्बन (राज्याध्यक्ष, भारतीय जनसंसद), कैलास पठारे (सरपंच), अशोक ढगे, वीर बहादुर प्रजापती, सुनील टाक, पोपटराव साठे, रईस शेख यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

Tags: Ganesh Ingle
Previous Post

शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखोंची बक्षीस रक्कम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Next Post

गडचिरोलीच्या सुपुत्राचा ‘यूपीएससी’त डंका; वडिलांचे छत्र हरपले, तरी ध्येय केले साध्य…

Related Posts

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026
1
ताज्या घडामोडी

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026
0
सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले
ताज्या घडामोडी

सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

May 2, 2026
3
ताज्या घडामोडी

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026
5
दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

May 2, 2026
6
ताज्या घडामोडी

चाकूर तालुक्यात बारावीचा निकाल जाहीर; सिद्धेश्वर विद्यालयाचा १००% निकाल

May 2, 2026
5
Next Post

गडचिरोलीच्या सुपुत्राचा ‘यूपीएससी’त डंका; वडिलांचे छत्र हरपले, तरी ध्येय केले साध्य…

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In