
नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी):दि.६ मार्च
संकटाच्या काळोखातही जिद्दीचा दिवा तेवत ठेवला तर यशाचा सूर्य निश्चितच उगवतो,’ हे गडचिरोलीच्या रजत सुनील वाळके याने सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रँक पटकावत रजतने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे, सध्या ओडिशात ‘सीआरपीएफ’मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा बजावत असतानाच त्याने हे यश खेचून आणले आहे.संकटाच्या काळोखातही जिद्दीचा दिवा तेवत ठेवला तर यशाचा सूर्य निश्चितच उगवतो,’ हे गडचिरोलीच्या रजत सुनील वाळके याने सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रँक पटकावत रजतने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे, सध्या ओडिशात ‘सीआरपीएफ’मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा बजावत असतानाच त्याने हे यश खेचून आणले आहे.




