महापालिकेच्या नेहमी वादग्रस्त ठरलेल्या जन्म मृत्यू विभागाने आता आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने आणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख गिरीश पाठक यांनी या विभागाला आता हाय टेक बनवण्याचे ठरवले असून नेहमी वादग्रस्त ठरलेला मिरज विभागीय कार्यालयातील या विभागाचे संगणकीकरण झाले असून सध्या जुने रेकॉर्ड्स ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती विभाग प्रमुख गिरीश पाठक यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली ते म्हणाले प्रथम आपल्या वृत्तवाहिनीला आमच्या शुभेच्छा, आमच्या विभागामध्ये जन्म मृत्यू च्या नोंदी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच मॅन्युअली होत होत्या मध्यंतरी अपुरे मनुष्य बळ आणी संगणक संख्या कमी असल्याने त्यातच नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मी या विभागाचे संपूर्ण संगणकीकरण करण्याचा आणि मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव आयुक्त सत्यम गांधी यांच्या समोर ठेवला त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे संगणकीकरण करून त्याप्रमाणे सांगली,मिरज आणि कुपवाड विभागीय कार्यालयांमध्ये संगणकांची संख्या आणि त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ वाढवल्याने जन्म मृत्यू नोंदीची प्रक्रिया सुलभ झाली आहे तसेच आम्ही झिरो पेंडंसी करण्याचे ठरवत आहोत मात्र हा विभाग अतिशय महत्वाचा असल्याने रोज जन्म मृत्यू नोंदणीची संख्या शेकडोच्या घरात आहे सध्या आम्ही अर्ज दाखल करुन घेत आहोत आणी नागरिकांना ठराविक दिवस देत आहोत त्या त्या दिवसाला त्या नागरिकांच्या नोंदी पूर्ण करून देत आहोत सध्या जुन्या बारकोड पद्धत रद्द झाल्याने नव्याने बारकोड असलेले जन्म दाखल्यांची आवश्यकता आहे त्यामुळे नागरिकांना थोडा त्रास जरूर आहे मात्र प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विना विलंब आम्ही नोंदी ची पूर्तता करत आहोत. ते पुढे म्हणाले, महापालिका क्षेत्रामध्ये मध्यंतरी अनधिकृत रित्या रहात असल्याच्या तक्रारी होत्या सध्या आम्ही नव्याने जन्म दाखले देणे सुरु केले आहे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड आणी इतर आवश्यक कागदपत्र आमच्या विभागात सादर करुन नव्याने जन्मदाखले घ्यावेत सध्या आम्ही नागरिकांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणावर संगणकी करण करुन घेतले आहे सांगलीप्रमाणे मिरज आणी कुपवाड विभागीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारचे काम सुरु असून आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणी उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा विभाग आद्ययावत होत आहे सध्या फेब्रुवारी अखेर आमच्या विभागाच्ची पेंडंसी 4000 अर्जावरून 600 अर्जापर्यंत इतकी कमी आम्ही केली आहे. यापुढेही कामाचा वेग वाढलेला असेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला










