नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील शिरसगाव ते वरखेड हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांसह भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर Satyashodhak Annabhau Sathe Smarak Pratishthan Maharashtra State च्या वतीने प्रशासनाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दि. १३ मार्च २०२६ रोजी संस्थापक अध्यक्ष Namdevrao Chandane यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, अहिल्या नगर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शिरसगाव–वरखेड मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था मांडण्यात आली असून, दळणवळणासाठी तसेच देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, दि. १ एप्रिल २०२६ पर्यंत या रस्त्याबाबत ठोस कार्यवाही करून दुरुस्ती करावी, तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता (नेवासा), तहसीलदार नेवासा, पोलीस निरीक्षक नेवासा तसेच ग्रामपंचायत वरखेड यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर समाज भूषण पुरस्कार प्राप्त Kadu Baba Londhe, Sunil Sakat, Hirabai Gorkhe यांच्यासह संतोष शेलार, अशोक भोसले, निलेश चांदणे, दत्तू गोरखे, लक्ष्मण साबळे, लखन साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे.











