• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘हर घर जल’ कागदावरच; सुरगाव ग्रामपंचायतीविरोधात नागरिक आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

🔥 पाणी न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
🔥 पीडित नागरिकाची जिल्हा परिषदेकडे धाव

सेलू (वर्धा):
केंद्र व राज्य सरकारच्या हर घर जल योजना अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा दावा केला जात असताना, सेलू तालुक्यातील सुरगाव (रेहकी) येथे मात्र वास्तव वेगळेच चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित आडमुठेपणामुळे एका नागरिकाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

सुरगाव (रेहकी) येथील वॉर्ड क्र. ३ मधील रहिवासी प्रमोद सुखदेवराव कांबळे यांच्या घराला गेल्या अनेक वर्षांपासून नळजोडणी असूनही पाणी मिळत नसल्याचा आरोप आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याप्रकरणी कांबळे यांनी जिल्हा परिषद, वर्धा येथील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी ग्रामपंचायत सचिव आणि माजी सरपंच यांच्यावर गंभीर आरोप करत, “जाणूनबुजून पाणी पुरवठा रोखण्यात येत आहे,” असा दावा केला आहे.

पिण्याचे पाणी हा मूलभूत अधिकार असून तो नाकारला जात असल्याने कांबळे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरू न केल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच आवश्यक असल्यास मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या तक्रारीवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


🟥 नागरिकाची भूमिका (चौकट):
“सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचा गाजावाजा फक्त कागदावरच आहे. माझ्या घराला वर्षानुवर्षे पाणी मिळालेले नाही. वारंवार विनंती करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पिण्याचे पाणी हा माझा हक्क आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार असून मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार आहे. अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहील.”
— प्रमोद सुखदेवराव कांबळे, रहिवासी, वॉर्ड क्र. ३, सुरगाव (रेहकी)

Previous Post

सेलूतील मादी बिबट्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; दोषींवर निलंबनाची मागणी

Next Post

श्रीगोंद्यात जागतिक ग्राहक दिन साजरा न झाल्याने ग्राहक संघटना आक्रमक

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post

श्रीगोंद्यात जागतिक ग्राहक दिन साजरा न झाल्याने ग्राहक संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In