छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ (MPSP) राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. २०२५/२०२६ सत्रात महाराष्ट्रभरातील सुमारे १५ लाख मुलींना प्रशिक्षण देऊन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे लक्ष्य आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्दिष्ट मुलींना सशक्तीकरण, संरक्षण आणि जीवन कौशल्य विकसित करणे आहे. विद्यार्थिनींना चार प्रमुख विषयांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे:
- संरक्षणाचे धडे – स्वतःचे रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण.
- योगा प्रशिक्षण – मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी योगा.
- जीवन कौशल्य प्रशिक्षण – स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे.
- मूलभूत सैनिकी प्रशिक्षण – डिसिप्लिन, सातत्य, खंबीरपणा आणि सराव यांचे महत्व समजावून देणे.
माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले, “मुलींचे सशक्तीकरण आणि सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे. या उपक्रमातून महाराष्ट्र देशासमोर आदर्श ठेवेल.”
हा उपक्रम राज्यात राबवला जाणारा सर्वात मोठा आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम असून युवतींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतो.
सदर प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षणाधिकारी प्राथमिक छत्रपती चव्हाण मॅडम यांच्या देखरेखीखाली राबवले जात आहे.
यामुळे मुलींना प्रत्यक्ष जीवनात स्वतःचे रक्षण कसे करावे, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखणे, जीवनातील आव्हानांना सामोरे जाणे आणि आत्मनिर्भरता मिळवणे या बाबत सखोल समज मिळणार आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे जिल्ह्यातील विद्यार्थिनींमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे निरीक्षण केले गेले आहे.







