नाशिक (प्रतिनिधी) : बागलान तालुक्यातील क-हे येथील विनोद जाधव व दिनेश जाधव या बंधूंनी शेतीत आंतरपिकांचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. दीड एकरात दाळींबासोबत टरबूज व मिरचीची लागवड करत त्यांनी टरबूजाचे तब्बल ३२ टन उत्पादन घेतले असून मिरचीला सध्या ४० रुपये किलो दर मिळत आहे.
या अभिनव प्रयोगामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत असून वडील गणसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना मोठा लाभ झाला आहे.











