नांदेड (प्रेस नोट) : केंद्र सरकारने सुमारे १११८ कोटी रुपये खर्च करून ४३ किलोमीटर लांबीची नवीन रेल्वे लाईन उभारून तख्त श्री दमदमा साहिब याला रेल्वेने जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना तख्त साहिबला भेट देणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने सर्व पाच तख्त साहिबांना रेल्वेने जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून, हा निर्णय त्याच दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
या निर्णयाचे संपूर्ण शीख समुदायाकडून स्वागत करण्यात आले आहे. याबद्दल नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचे आभार मानण्यात आले.
तसेच तख्त सचखंड साहिब चे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंह, प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह, सल्लागार जसवंत सिंह बॉबी आणि अधिक्षक रविंदर सिंह कपूर यांच्यासह गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड व संपूर्ण शीख समुदायाने या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.











