गोविंदपूर (प्रतिनिधी) : गोविंदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ अभियानांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये ३१ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवणे आणि एकही विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
यावेळी मुख्याध्यापक हनमंलू कनकवाड, शिक्षक गोविंद गोरे, संजय भालेराव, वसंत इंगळे, गणपत तपिसे तसेच शिक्षिका मंजुषा घोळवे, मनिषा कदम, अनिता आनेराव, वैशाली बांगर, पौर्णिमा मुधोळकर, विष्णू मुंडे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









