पालघर (तारापूर): तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ‘आरती फार्मलॅब’ (युनिट-६) या कंपनीत झालेल्या विषारी वायूगळतीमुळे १७ कामगारांना विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
१७ जण रुग्णालयात दाखल वायू हवेत पसरताच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना श्वसनाचा त्रास, मळमळ आणि चक्कर येऊ लागली. या वायूबाधेमुळे तब्बल १७ कामगारांची प्रकृती बिघडली असून, त्यांना तातडीने बोईसर येथील ‘लाईफलाईन’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र अनेक कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.




