उदगीर प्रतिनिधी : प्रभू श्रीराम हे सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचे प्रतीक असून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात एकोपा, शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचे कार्य आपण सर्वांनी करावे. आजच्या तरुणांनी प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरात श्रीराम नवमी निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेदरम्यान बोलत होते. श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने शहरात पारंपरिक उत्साहात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक व सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथांमधून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आ. संजय बनसोडे यांनी उपस्थितांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देत शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा शीतल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीपकुमार मटके, ज्ञानेश्वर बिरादार, नगरसेविका निकिता अंबरखाने, रेखा उप्परबावडे तसेच विजय निटुरे, आशिष अंबरखाने, धिरज कसबे, धनाजी मुळे, मनोज पुदाले, प्रशांत मांगुळकर, सतीश पाटील, अमोल अनकल्ले, कैलास पाटील, वसंत पाटील, संतोष गिरी महाराज, यमुनाजी भुजबळे, कमलाकर फुले, कुणाल बागबंदे, नरसिंग शिंदे, प्रकाश बिरादार, अमोल निडवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शोभायात्रेदरम्यान पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा शांततेत व उत्साहात पार पडली.







