• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सूर्यफुलातून ‘पिवळं सोने’; पोई गावच्या शिक्षक-शेतकऱ्याचा आदर्श प्रयोग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
सूर्यफुलातून ‘पिवळं सोने’; पोई गावच्या शिक्षक-शेतकऱ्याचा आदर्श प्रयोग
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील पोई गावातील शिक्षक-शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतीमुळे आदर्श निर्माण केला आहे. विविध पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी केवळ उत्पादन वाढवले नाही, तर इतर शेतकऱ्यांनाही नव्या दिशेने प्रेरित केले आहे.

सांबरे यांनी स्ट्रॉबेरी, सुरण, आले, हळद, झेंडू, भाजीपाला व भात यांसारख्या पिकांमध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या देशांचा शेती अभ्यास दौरा करून तेथील तंत्रज्ञान आपल्या शेतीत प्रभावीपणे वापरले आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

यंदा त्यांनी पोई गावात एक एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन व मल्चिंगच्या साहाय्याने सूर्यफुलाची लागवड केली असून हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे. जिल्हा परिषद ठाणे व कल्याण पंचायत समितीच्या शेष फंडांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांनी ‘पिवळं सोने’ पिकवले आहे. त्यांच्या शेतातील सूर्यफुलांचे आकार व उत्पादन पाहून अनेक शेतकरी, पर्यटक आणि कृषी अधिकारी आकर्षित झाले आहेत.

सांबरे यांच्या मते, सूर्यफूल शेती कमी खर्च, कमी पाणी व कमी मेहनतीत अधिक उत्पन्न देणारी आहे. एकरी सुमारे १५ हजार खर्चात ८ ते ९ क्विंटल उत्पादन मिळते. यापासून लाकडी घाण्यावर तेल काढल्यास सुमारे ३५० लिटर तेल उत्पादन मिळू शकते. सध्या या तेलाला चांगला बाजारभाव मिळत असून एकरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

या यशस्वी प्रयोगामुळे ठाणे जिल्ह्यात सूर्यफूल शेतीला नवी दिशा मिळाली असून इतर शेतकऱ्यांनीही या पिकाकडे वळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाने अधिक अनुदान देऊन तेलबिया उत्पादन वाढीस चालना द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

Tags: Gurunath Sambre
Previous Post

वाई नगरपरिषदेच्या गटार कामांवर प्रश्नचिन्ह; दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप

Next Post

पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
61
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
9
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
20
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In