परभणी (प्रतिनिधी) :
के.के.एम महाविद्यालयात दि. २ एप्रिल २०२६ रोजी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी सक्षम राहावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या स्पर्धेत एकूण १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत – प्रथम क्रमांक सागर संतोष पांढरे व शहाणे अशोक दीपक, द्वितीय क्रमांक वैष्णवी आदेश धर्माधिकारी, तृतीय क्रमांक प्रशांत विष्णू उकलकर तर उत्तेजनार्थ बक्षीस रखमेश शिंदे यांनी पटकावले.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक श्री. दिलीपजी हिबारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, प्राचार्य डॉ. नागनाथ कदम तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित मोरे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता वाढविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने राज्यशास्त्र विभागाकडून अशा विविध स्पर्धांचे नियमित आयोजन करण्यात येते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य के. जी. हुगे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल संस्थाचालक व प्राचार्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.











