(प्रतिनिधी) :
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून विविध आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञ Dr. Rajendra Rakshe यांनी दिली आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे जनावरांमध्ये ताप, डेंगूसदृश लक्षणे, थायलरीया, डायरिया तसेच कासदाह यांसारखे आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पशुपालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जनावरांना उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना थंड व सावलीच्या ठिकाणी ठेवावे. दिवसातून किमान चार ते पाच वेळा स्वच्छ व थंड पाणी पिण्यास द्यावे. तसेच दिवसातून किमान दोन वेळा स्वच्छ पाण्याने त्यांना धुवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी गाईचे मालक श्री सीताराम शांताराम वाडेकर व सौ. चित्रा वाडेकर बहुळ यांना जनावरांच्या आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.










