जळकोट (प्रतिनिधी) :
जळकोट तालुक्यातील आरती महेंद्र गायकवाड यांच्या सामाजिक व वैचारिक कार्याची दखल घेत त्यांना ‘महामानव B. R. Ambedkar राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानामुळे जळकोट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
हा पुरस्कार कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दि. ११ एप्रिल रोजी आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास माजी आमदार तथा मंत्री सतीश पाटील, माजी उपमहापौर भोपाल रेड, साहित्यिक मिलिंद यादव, कवी वसंत भागवत, सचिन खराटे, सुरेश केसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.










