मौजे उत्रादा, तालुका चिखली येथील जलजिवन योजने अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे नित्कृष्ट कामाबाबतची चौकशी करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु
चिखली प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उत्रादा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली मार्फत उत्रादा गावाजवळ असलेल्या खोऱ्यातील धरणामध्ये उत्रादा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचे बांधकाम हे अत्यंत कमी खोलीचे घेण्यात आलेले असून तेथून गावात येणारी पाईप लाईन चे खोदकाम तसेच पाईपाची जुळवणी यामध्ये तफावत असून थातुरमातुर जोडण्यात आलेली आहे.
तसेच ५० हजार लिटरची क्षमता असलेला १२ मी. उंच जलकुंभ सिमेंट काँक्रीटद्वारे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी व त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकून तपासणी केली असता प्रथमतःच पाणी टाकल्यावर सदर पाण्याची टाकी ही झिरपु लागली व त्यातून पाण्याची गळती झाली. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकल्यानंतरची गळती होत असतांना गावातील प्रतिष्ठीत व पत्रकार हजर होते. त्यांचे समक्ष पाणी गळती झाली यावरुन या पाण्याच्या टाकीचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे यामध्ये वापरण्यात आलेली रेती, वाळू, गिट्टी, लोहा इत्यादी बांधकामासाठी लागणारे साहित्याची मात्रा ही कोटेशन मध्ये दिलेल्या अटी व नियमाप्रमाणे आहे किंवा कसे याची चाचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आज रोजी पाण्याची टाकी जर गळत असेल तर त्यामध्ये संपूर्ण पाणी भरल्यानंतर पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ती पाण्याची टाकी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नसून त्याखाली उत्रादा गावातील महिलांचा व लोकांचा व लहान मुलांचा जिव जाण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास यास केवळ संबंधीत अधिकारी व ठेकेदार हेच जबाबदार राहतील.
या जलकुंभाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम तसेच विहीरीचे संपूर्ण खोलीकरणाचे काम याची क्वॉलीटी कंट्रोल बांधकाम मंडळ अकोला यांचे मार्फत वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करुन त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात यावे. तसेच प्रत्येक गावकऱ्याच्या घरासमोर पाईप लाईनचे कनेक्शन आणुन सोडलेले आहे ते काम अर्धवट सोडलेले आहे. तसेच पाईपलाईनच्या विहीरीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपाच्या व्यासाची मि.मी. लांबी रुंदीची चौकशी करण्यात यावी. तरी सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित कामात दोषी आढळल्यास ठेकेदारास काळया यादीमध्ये टाकून त्याचे संपूर्ण बिल रोखण्यात यावे कारण बिल दिल्यावर ठेकेदार पळून गेल्यावर यदाकदाचीत पाण्याची टाकी पडल्यावर यास जबाबदार कोण? त्यासाठी तक्रारकर्त्याच्या नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तेव्हाच बिल काढावे असे न झाल्यास उपरोक्त कामाची चौकशी न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही न झाल्यास आम्ही आमरण उपोषण सुरूचं ठेवू. यामुळे आमच्या जीवितास धोका झाल्यास तसेच होणाऱ्या संपूर्ण परिणामाची जबाबदारी ठेकेदाराची व संबंधित अधिकाऱ्याची राहील याची शासनाने नोंद घ्यावी.








