• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
उत्रादा गावात जलजिवन योजनेच्या कामात फार मोठा भ्रष्टाचार
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

मौजे उत्रादा, तालुका चिखली येथील जलजिवन योजने अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे नित्कृष्ट कामाबाबतची चौकशी करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु

RelatedPosts

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

पालघर जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना हातात हात घेऊन करणार पाणीटंचाईवर मात

चिखली प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उत्रादा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली मार्फत उत्रादा गावाजवळ असलेल्या खोऱ्यातील धरणामध्ये उत्रादा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचे बांधकाम हे अत्यंत कमी खोलीचे घेण्यात आलेले असून तेथून गावात येणारी पाईप लाईन चे खोदकाम तसेच पाईपाची जुळवणी यामध्ये तफावत असून थातुरमातुर जोडण्यात आलेली आहे.


तसेच ५० हजार लिटरची क्षमता असलेला १२ मी. उंच जलकुंभ सिमेंट काँक्रीटद्वारे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी व त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकून तपासणी केली असता प्रथमतःच पाणी टाकल्यावर सदर पाण्याची टाकी ही झिरपु लागली व त्यातून पाण्याची गळती झाली. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकल्यानंतरची गळती होत असतांना गावातील प्रतिष्ठीत व पत्रकार हजर होते. त्यांचे समक्ष पाणी गळती झाली यावरुन या पाण्याच्या टाकीचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे यामध्ये वापरण्यात आलेली रेती, वाळू, गिट्टी, लोहा इत्यादी बांधकामासाठी लागणारे साहित्याची मात्रा ही कोटेशन मध्ये दिलेल्या अटी व नियमाप्रमाणे आहे किंवा कसे याची चाचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आज रोजी पाण्याची टाकी जर गळत असेल तर त्यामध्ये संपूर्ण पाणी भरल्यानंतर पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ती पाण्याची टाकी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नसून त्याखाली उत्रादा गावातील महिलांचा व लोकांचा व लहान मुलांचा जिव जाण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास यास केवळ संबंधीत अधिकारी व ठेकेदार हेच जबाबदार राहतील.

या जलकुंभाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम तसेच विहीरीचे संपूर्ण खोलीकरणाचे काम याची क्वॉलीटी कंट्रोल बांधकाम मंडळ अकोला यांचे मार्फत वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करुन त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात यावे. तसेच प्रत्येक गावकऱ्याच्या घरासमोर पाईप लाईनचे कनेक्शन आणुन सोडलेले आहे ते काम अर्धवट सोडलेले आहे. तसेच पाईपलाईनच्या विहीरीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपाच्या व्यासाची मि.मी. लांबी रुंदीची चौकशी करण्यात यावी. तरी सदरील निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित कामात दोषी आढळल्यास ठेकेदारास काळया यादीमध्ये टाकून त्याचे संपूर्ण बिल रोखण्यात यावे कारण बिल दिल्यावर ठेकेदार पळून गेल्यावर यदाकदाचीत पाण्याची टाकी पडल्यावर यास जबाबदार कोण? त्यासाठी तक्रारकर्त्याच्या नाहरकत प्रमाणपत्र घेवुन तेव्हाच बिल काढावे असे न झाल्यास उपरोक्त कामाची चौकशी न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही न झाल्यास आम्ही आमरण उपोषण सुरूचं ठेवू. यामुळे आमच्या जीवितास धोका झाल्यास तसेच होणाऱ्या संपूर्ण परिणामाची जबाबदारी ठेकेदाराची व संबंधित अधिकाऱ्याची राहील याची शासनाने नोंद घ्यावी.

Previous Post

अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर; दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता

Next Post

मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

Related Posts

ताज्या घडामोडी

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

April 9, 2026
1
बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा
ताज्या घडामोडी

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

April 9, 2026
1
पालघर जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना हातात हात घेऊन करणार पाणीटंचाईवर मात
ताज्या घडामोडी

पालघर जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना हातात हात घेऊन करणार पाणीटंचाईवर मात

April 9, 2026
2
वृक्षतोड: पर्यावरणासाठी वाढता धोका; संवर्धन हीच काळाची गरज
ताज्या घडामोडी

वृक्षतोड: पर्यावरणासाठी वाढता धोका; संवर्धन हीच काळाची गरज

April 9, 2026
1
चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांचा माहूर येथे सन्मान….!!!
ताज्या घडामोडी

चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांचा माहूर येथे सन्मान….!!!

April 9, 2026
0
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन
ताज्या घडामोडी

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

April 9, 2026
0
Next Post
मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष परिषद; फलज्योतिषविरोधी जनजागृतीचा संदेश

April 9, 2026

पाचोड येथील महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या तक्रारी

April 9, 2026
बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

April 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In