कोल्हापूर (प्रतिनिधी):
शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे ‘माही’ यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर मटण वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी पहाटेपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
परंपरेचा भाग म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात शहरासह परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले. स्वस्त दरात आणि पारदर्शक पद्धतीने मटण मिळत असल्याने नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पहाटेपासूनच रांगा लागल्या असून, शिस्तबद्ध पद्धतीने मटणाचे वाटप करण्यात येत होते. आयोजकांनी योग्य नियोजन करून गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली होती.
‘माही’ यात्रेच्या निमित्ताने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडत असून, या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









