नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर सीबीआयने धाड टाकली आहे, या कारवाईत 1 कोटी 20 लाख रूपये आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात बनावट कॉल सेंटरवर प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली भयंकर प्रकार चालू होता. नाशिकमधील इगतपुरीमधून ही घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बनावट कॉल सेंटर प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आता सीबीआयने आयपीएस अधिकार्यांना नोटीस पाठवली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणातून दिवसेंदिवस अनेक वेगवेगळे धागेदोरे उघडकीस येत आहेत.
नाशिकमधील इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड करण्यात आला आहे. आता या इगतपुरीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील धागेदोरे काही वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांपर्यत पोहोचले आहेत. सीबीआयकडून या बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास सुरू आहे. फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही तर, ठाणे जिल्हा ग्रामीण, पालघर जिल्हा आणि नवी मुंबई मध्येही सीबीआय बनावट कॉल सेंटर प्रकरणात तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि नवी मुंबईतील अनेक परिसरामध्ये अनेक बनावट कॉल सेंटर सुरू होते.
राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीप्रमाणे ते कॉल सेंटर ट्रान्सफर करून घेतले होते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील रिसॉर्टवर सीबीआय अधिकाऱ्यांनी धाड टाकून मोठ्या बनावट कॉल सेंटर रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात बनावट कॉल सेंटरवर कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सीबीआयने राज्यातील आयपीएस अधिकार्यांना नोटीस पाठवली आहे. राज्यात सीबीआयने धाड टाकलेले सर्व कॉल सेंटर उद्धवस्त करण्यात आले आहेत.
राज्यात या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक परदेशी नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. सीबीआयच्या टीमने या कडक कारवाईत 1 कोटी 20 लाखांची कॅश आणि अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सीबीआयकडून या बनावट कॉल सेंटर प्रकरणाची चौकशी केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन मनी देऊन हे बनावट कॉल सेंटर रॅकेट चालवले जात असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने डिसेंबर 2025 मध्ये नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे. चौकशीसाठी हे अधिकारी दिल्लीमध्ये गेले असल्याची माहिती उघड झाली होती. सध्या पोलिसांकडून अनेक ठिकाणी धाड टाकून चौकशी केली जात आहे. ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर जिल्हा, नवी मुंबई, नाशिक जिल्हा, अहिल्यानगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही बनावट कॉल सेंटर रॅकेट पसरली आहेत, त्या आयपीएस अधिकार्यांना चौकशीसाठी सीबीआय बोलवत आहे. या प्रकरणात पुढील अधिक तपास सीबीआय आणि नाशिक पोलिस करत आहेत.









