• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालघर जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना हातात हात घेऊन करणार पाणीटंचाईवर मात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
पालघर जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना हातात हात घेऊन करणार पाणीटंचाईवर मात
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

वाडाः जिल्ह्यात सुरू असलेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे सहकार्य घेतले जाईल. असे पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई संदर्भात श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाशी ते स्वतंत्र्यपणे बोलत होते.

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई मनोज रानडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात राहून गेलेले गाव पाडे संघटनेने निदर्शनास आणून दिल्याबद्दल रानडे यांनी श्रमजीवी संघटनेचे आभार मानले.

श्रमजीवी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार पालघर जिल्ह्यातील वाडा

(५८), तलासरी (२०), मोखाडा (६२), डहाणू (१४), वसई (४१), जव्हार (१३) आणि विक्रमगड (३४) अशा मोठ्या प्रमाणावर गाव-पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जिथे शक्य आहे तिथे बोअरवेल उपलब्ध करून द्याव्यात तसेच पाणीटंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने ३१ मे पर्यंत आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींना आधारकार्ड मिळवून देण्याबाबत करावयाच्या कृती कार्यक्रमाची चर्चा केली. तसेच वन अधिकार प्रलंबित दाव्या बाबत अजूनही ग्रामपंचायत स्तरावर ८८३१ व जिल्हा स्तरावर ३३४५ इतके वनदावे प्रलंबित

असल्याचे वास्तव मांडले यावर रानडे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत ग्वाही दिली. दरम्यान, पालघर जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी संघटनेच्या संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, प्रभारी जिल्हा सचिव कैलास तुंबडा, जिल्हा महिला प्रमुख रेखा पन्हाड आणि जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघु चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे, विक्रमगड तालुका अध्यक्ष मंगेश काळे, तलासरी तालुका अध्यक्ष सुरक्षा रायात, वसई शहर तालुका अध्यक्ष नारायण विघ्ने, डहाणू तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र उंबरकर, वाडा तालुका सचिव सुरज दळवी, पालघर तालुका कार्यालयीन सचिव शंकर वरखंडे उपस्थित होते.

Previous Post

वृक्षतोड: पर्यावरणासाठी वाढता धोका; संवर्धन हीच काळाची गरज

Next Post

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
5
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
25
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post
बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

बोरद येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; रावलापानीच्या इतिहासाचा उजाळा

ताज्या बातम्या

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In