अर्धापूर
अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन सोहळा सोमवार, दि. ३० मार्च रोजी मान्यवरांच्या उप स्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्य क्रमामुळे अर्धापूर शहरातील आंबेडकरी अनुयायी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाला अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जगदीश दळवी, नगरा ध्यक्ष प्रतिनिधी प्रविण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदीर खान पठाण, लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, माजी नगराध्यक्ष उमाकांत (उमेशभाऊ) सोनाजी सरोदे, प्रल्हादराव माटे, व्यंकटी राऊत, नामदेव सरोदे, बबनराव लोखंडे, केशव कोल्हे, शहबाज बेग, रिजवान शेख, पत्रकार ओमप्रकाश पत्रे, राजेश्वर देशमुख, वैभव माटे, शुभम लुटे, भीमराव सरोदे, भुजंगराव माटे, अशोकराव माटे, गंगारामजी राऊत, महेंद्र सरोदे, शितल कांबळे,
इंजिनियर संदीप वानखेडे साहेब, अक्षय कांबळे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कर उमाकांत (उमेशभाऊ) सरोदे यांनी सांगितले की, मागील दहा वर्षांपासून आंबेडकर अनुयायी या पुतळ्यांच्या उभारणीची संयमाने प्रतीक्षा करत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि विद्यमान आमदार श्रीजया चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे आज हा ऐतिहासिक क्षण साकार झाला आहे. लवकरच हे पुतळे उभारले जाऊन अर्धापूरच्या वैभवात
भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच चव्हाण परिवाराचे आणि सर्व अनुयायांचे आभार मानत पुतळ्यांचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सर्व मान्यवराचे जयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे यांच्यातर्फे शाल व पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते. आंबेडकरी अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनानंतर उपस्थितांनी पुढील कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.







