• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत येथील खोकीधारकांचा प्रश्न सोडवावा; आ. गोपीचंद पडळकर यांच्याकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

बातमी :
जत (प्रतिनिधी – अरुण कोळी) : जत शहरातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांलगत व्यवसाय करणाऱ्या खोकीधारकांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी भा.ज.पा. युवानेते व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी Gopichand Padalkar यांच्याकडे केली आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

कुंभार यांनी सांगितले की, जत-अथणी राज्य मार्ग तसेच प्रशासकीय भवनासमोरील ईश्वरपूर-चडचण राष्ट्रीय महामार्गावर अनेक वर्षांपासून खोकीधारक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, ही खोकी रस्त्यालगत असल्याने बांधकाम विभाग, जत नगरपरिषद आणि प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यामुळे खोकीधारक त्रस्त झाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आ. पडळकर यांनी यापूर्वी खोकीधारक व प्रशासन यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रस्ते रुंदीकरण आणि वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे निर्णय घेणे कठीण झाले आहे. एकीकडे खोकीधारकांचा व्यवसाय आणि दुसरीकडे महामार्ग विकासाची गरज यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे.

दरम्यान, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आ. पडळकर यांनी महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडी पूल या मार्गावरील सर्व खोकी व दुकानदारांसाठी जत नगरपरिषद व नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कॉम्प्लेक्समधील गाळे भाडे तत्वावर व्यवसायिकांना देण्यात येणार असून, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नगरपरिषदेला उत्पन्नही मिळणार आहे.

तसेच, प्रशासकीय भवनासमोरील राष्ट्रीय महामार्गावरील खोकीधारकांसाठी जिल्हा परिषदेकडील जागेवर दुकानगाळे उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम कधीही सुरू होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. शिवाय, महावितरण कंपनीकडून विजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईमुळे खोकीधारक अधिकच अडचणीत आले आहेत. या सर्व परिस्थितीत खोकीधारकांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे कुंभार यांनी नमूद केले आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त जत येथे युवा कीर्तनकार ह.भ.प श्री. संस्कार महाराज खंडागळे ( पंढरपूर ) यांच्या किर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

आ. वैभव गीते यांचा वाढदिवस सामाजिक लढ्याच्या प्रेरणेचा दिवस

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

आ. वैभव गीते यांचा वाढदिवस सामाजिक लढ्याच्या प्रेरणेचा दिवस

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In