जत येथिल श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
या ट्रस्ट च्या माध्यमातून कोरोना कालावधित एक महिनाभर कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नवोदीत किर्तनकारांना झी.टी.व्ही.च्या माध्यमातून गजर किर्तनाचा ,सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातून आपली किर्तनकला सादर करण्यासाठी गेली पाच वर्षे मेहनत व परिश्रम घेतले आहेत.
लवकरच श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्याकडून श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र सभागृह व वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा मनोदय आहे.
श्री.स्वामी समर्थ मंदिर,राजे शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येते.त्याच प्रमाणे जर पोर्णीमेला पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक पूजा,नंतर रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम व दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत श्री.स्वामी समर्थ महाराजांची आरती व श्री. स्वामी समर्थ चरणी पुष्पअर्पण करून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप ही ट्रस्ट च्या माध्यमातून अखंड सेवा सुरू आहे.
शनिवार दि.१५ एप्रिल २०२६ या दिवशी श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४८व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहाटे श्री.स्वामीसमर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून विधीवत पूजा ,त्यानंतर सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत विरशैव भजनीमंडळ रामपूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून, नंतर सकाळी दहा ते बारावाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार व समाज प्रबोधनकर ह. भ. प. श्री. संस्कारमहाराज खंडागळे ( पंढरपूर ) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.व त्यानंतर दुपारी बारावाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रींची आरती व श्री.स्वामी चरणांवर पुष्पअर्पण करण्यात येणार आहे.त्यानंतर श्री.स्वामी समर्थ भक्तांसाठी महाप्रसाद वाटप केले जाणार आहे.
श्री स्वामी समर्थ भक्तांनी केलेल्या सहकार्यातून स्वामींच्या पाठीमागील बाजूस साडेअकरा किलोची पितळी प्रभावळ बसविण्यात आली असून या प्रभावळीमुळे स्वामींच्या गाभाऱ्याची शोभा वाढली आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमास सर्व श्री.स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील,श्री.शहाजीबापू भोसले,वसंत उगळे,मोहन पवार, सदाशिव जाधव,सतीश चव्हाण ( मिस्त्री ) गणेश सावंत, अतुल मोरे,डी.बी.जाधव, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे दिपक पाटणकर, समर्थ पवार, आदीनी केले आहे.
