बातमी :
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : नक्षत्रवाडी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेचे उपमहापौर Rajendra Janjal यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील मूलभूत सुविधा, विकासकामे तसेच सामाजिक प्रश्नांबाबत समितीच्या वतीने उपमहापौरांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा सचिव कैलास भालेराव, भारत खोतकर, सुनील गायकवाड, जना खोतकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
