११ एप्रिल समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस ; बालासाहेब शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
/ प्रतिनिधी
जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, वसुंधरा महिला मंडळ, जिजामाता महिला मंडळ अतनूर यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अतनूर येथील मेन गेट जवळ चौकात महात्मा फुले द्विशताब्दी जयंती च्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
यापुर्वीच उदगीर, जळकोट विधानसभा मतदारसंघातील प्रभाग, वार्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, महात्मा गांधी चौक, अहिल्याबाई होळकर चौक, गाव, वाडी, तांडा, वस्तीत सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषांच्या जन्माचा दिवस नाही. तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाज व्यवस्थेला नवी दिशा मिळाली,
याकरिता फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा.असे प्रतिपादन दलितमित्र, प्राणीमित्र, वनसंवर्धनमित्र, ग्राहक चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा विधी न करता महात्मा फुले यांना अभिवादन करून त्यांनी केलेल्या स्त्रियांचे शिक्षण महान कार्य आणि सामाजिक बंधुत्वाची शिकवण या विचारांची आज समाजाला गरज आहे असे प्रबोधन केले. एकता आणि एकात्मता या संकल्पना देश बांधणीसाठी आणि देशातील लोकांची मने बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत या विचारांची पत्रके उपस्थितांना देण्यात आली आणि मिठाईचे वाटप केले. संविधान जागर, अंधश्रद्धेवर प्रहार करून सामाजिक प्रबोधन आणि बंधुत्वाची विचारधारा समाजातील घटकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संतांची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी प्रकाशित केलेल्या विविध १० संतांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आलेल्या पुस्तिकेचे व संविधान जागर पत्रिकेचे वाटप करण्यात आले. शक्ती आणि बुद्धी संवर्धनाचा संदेश सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी ग्राहक जनजागरण संरक्षण व मार्गदर्शन समितीचे राज्याध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सरपंच चंद्रशेखर पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सकेलन शेख, अँड.नवाज मुंजेवार, अँड.बी. एम.सासट्टे, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, चिचोंलीचे माजी सरपंच संतोष बट्टेवाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखाध्यक्ष वैजनाथ पंचगंल्ले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष बी.जी.शिंदे, जिजामाता महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मिणीबाई सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोविंदराव शिंदे आतनुरकर, ईस्माईल ताजोदीन मुंजेवार, संपादक गिरीधर गायकवाड, मानवी हक्क व संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे हिप्पळणारीकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.







