नेरूळ गाव, नवी मुंबई (प्रतिनिधी) :
नेरूळ परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने सामाजिक ऐक्य, समता आणि न्याय या मूल्यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी नगरसेवक गिरीश कान्हा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहेत. त्यांच्या विचारांचा अंगीकार करूनच समताधिष्ठित समाज निर्माण होऊ शकतो.”
हा कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, परिसरात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.











