वडाळा बहिरोबा (प्रतिनिधी):
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक मा. पोपटराव कांबळे यांनी करत बाबासाहेबांचे भारतीय राज्यघटनेतील योगदान, महाड चवदार तळे सत्याग्रह तसेच बौद्ध धम्माची दीक्षा याबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर मा. विश्वनाथ शेळके सर यांनी बाबासाहेबांचे भारतीय अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांबाबत विचार मांडले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे समन्वयक संतोष तेलतुंबडे यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान, धरण प्रकल्पांबाबतची दूरदृष्टी तसेच महिला व कामगार हक्कांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच ललित मोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच सचिन मोटे, बाबासाहेब मोटे, राहुल मोटे, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब मोटे, प्रतीक मोटे, निखिल मोटे, लहुतात्या मोटे, अशोक कांबळे, सागर तेलतुंबडे, सुरेश पाटीलबा मोटे, आतिष गायकवाड, लक्ष्मण मोटे, श्रीकांत मोटे, सुनिल पतंगे, सागर बहादुरे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक माळवे दादा व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











