रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) : कावळे विहीर येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी निरोप समारंभ आणि गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. स्वातीताई दत्ताशेठ पाचुंदकर पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलासराव बत्ते, उपाध्यक्ष निलेशराव शेळके, गणेशशेठ लांडे, ग्रामपंचायत सदस्य निलेशबाप्पू लांडे, माजी सदस्य सुनिल लांडे सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे पाटील, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. निरोपाच्या क्षणी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी व्यक्त करत भावनिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







