सेलू (प्रतिनिधी) :
सेलू शहरातील विकास चौक परिसरात Dr. B. R. Ambedkar जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोख्याचे सुंदर उदाहरण घालून दिले.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी ‘गरीब नवाज तंजीम कमिटी’च्या वतीने थंडगार पेयांचे (कोल्ड्रिंक्स) वाटप करण्यात आले. एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला, ज्यामुळे रॅलीतील अनुयायांना मोठा दिलासा मिळाला.
सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विकास चौक येथे या सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन आंबेडकर जयंती रॅलीत सेवा दिल्याने समाजात एकोपा, बंधुता आणि प्रेमाचा संदेश पसरला.
या प्रसंगी हिम्मत अली शाह, इम्रान पठाण, इकबाल शेख, कदीर पठाण, रिजवान शेख, जलील शेख, हनिफ सैय्यद, आदिल शेख, काशिनाथ लोणकर, नवीनकुमार पाटील गुरुजी, सारंग तायडे, जुबेर शेख, रहीम शेख, सुजल कुंभलकर, अरशद पठाण, अहमद शाह, सलमान पठाण, शालिक भगत, नरेश धनवीज, निखिल नंदेश्वर, शंकर पानबुडे आदींनी सहकार्य केले.
या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थित नागरिक व मान्यवरांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. समाजात एकोपा आणि सौहार्द वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
गरीब नवाज तंजीम कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सेलू शहरात या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून सामाजिक ऐक्याचा सकारात्मक संदेश दिला जात आहे.










