श्रीगोंदा :- प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाने आर.टी.एस. (RTS) परीक्षेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी संस्थेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी
अलिया शेख १५२ गुण मिळवून व अनुष्का इधाटे १३८ गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. यामध्ये विभाग प्रमुख सुमती सुरसे, विषय शिक्षक बाळासाहेब ठोंबरे, मधुवंती शिवगुंडे, बापूसाहेब ओहोळ, ज्ञानदेव कडाळे, विजय चव्हाण आणि ज्योती नरवडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य अण्णासाहेब शेलार, सरपंच ऋषिकेश शेलार, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तात्यासाहेब हिरवे,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खेडकर, उपप्राचार्य बापूसाहेब दिघे, पर्यवेक्षिका शामलम हरिभक्त आणि लाईफ वर्कर विलास लबडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल,” अशी भावना यावेळी अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केली.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल संपूर्ण बेलवंडी परिसरातून विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.








