शिक्षण हेच समाज उन्नतीचेसाधन* आहे. *राजेंद्र खेडकर
श्रीगोंदा :- प्रतिनिधी
शिक्षण हेच समाज उन्नतीचे साधन आहे असे प्रतिपादन श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र खेडकर यांनी केले ते राहुल विद्यार्थी वस्ती गृह श्रीगोंदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्क्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अनिल भदागरे , होते. यावेळी माजी प्राचार्य जालिंदर रामफळे, पत्रकार श्रीरंग साळवे, सतिश ओहोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. खेडकर पुढे म्हणाले आंबेडकर.यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते पारसी घेऊन भाषा घेऊन उत्तीर्ण झाले.1916 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. उपाधी प्राप्त केली.
हे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना जाती व्यवस्था, समाज व्यवस्था, या सर्व गोष्टींचा त्रास झाला. परंतु या सर्वांवरती शिक्षण हाच उपाय आहे हे त्यांनी मनाशी ठरवले होते. हाच आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे व राहूल वसतीगृहाचे व देशाचे नाव मोठे करावे असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी जय शिंदे, अनिकेत सोनवणे या मुलांनी भाषण केले. उपस्थित सर्वांचे आभार अधिक्षक सुमेध ओहोळ यांनी मांडले .
चौकट
यावेळी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप राजेंद्र खेडकर यांनी केले, अनिल दादागिरी यांनी खाऊचे वाटप केले, श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार मिलिंद जी जाधव यांनी फळाचे वाटप केले. शामलम हरिभक्त यांनी विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न दिले.








