दर्यापूर (प्रतिनिधी) :
दर्यापूर तालुक्यातील नाफेड चणा खरेदी केंद्रावर बारदाना (गोण्या) अभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे चणा विक्री प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बारदाना तात्काळ उपलब्ध करून देत खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांची अडचण वाढली
बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल केंद्रावर जमा करता येत नाही. परिणामी वेळेवर पैसे मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढत आहेत. बाजारातील दरात चढ-उतार होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
निवेदनावेळी उपस्थित मान्यवर
या वेळी इंजि. नितेश वानखडे (महाराष्ट्र प्रदेश महासचिव, युवक काँग्रेस), भैय्याजी पवार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), कपील ढोके (उपाध्यक्ष तथा प्रवक्ते, युवक काँग्रेस), राहुल येवले (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण), अनिकेत ढेंगळे (कार्याध्यक्ष), ऋग्वेद सरोदे (अध्यक्ष, दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेस), सागर देशमुख (अध्यक्ष, दर्यापूर तालुका युवक काँग्रेस) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच चेतन गिते, राजेश देशमुख, निलेश मेश्राम, सैय्यद सोहेल, सचिन मांडोकार, ऋषिकेश शेंगोकार, निशांत कोथळकर, धनराज बनसोड, योगेश वानखडे, रवी खिराडे, गौरव आठवले, रोशन वऱ्हाडे, हिमांशू अब्रुक, जगदीश कांबे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
त्वरित उपाययोजनेची मागणी
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने बारदाना उपलब्ध करून देत खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.










