सेलू (जि. परभणी, प्रतिनिधी)
शहरातील गायत्री नगर मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी बिघडत चाललेली परिस्थिती पोलीसांना हाताळण्यात अपयश आल्याने आणि राजकीय दबावामुळे पोलीसांनीच अँड विष्णू ढोले यांच्यावर १०९/१ व शस्त्र वापर असे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवून एक प्रकारे खुनातील आरोपीची पाठराखण करण्यासाठीच दखल केलेला गुन्हा खोटा असल्याची माहिती अँड विष्णू ढोले यांच्या पत्नी अँड सुनीता ढोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार २५ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना अँड सुनीता ढोले म्हणाल्या की, १६एप्रिल रोजी रात्री बारानंतर घडलेल्या मारहाणीच्या घटनेत आदित्य प्रधान वय२२ वर्षे याचे उपचारादरम्यान निधन झाले तर गंभीर जखमी असलेल्या आनंद ढोले याच्यावर परभणी शासकीय रुग्णालय आत उपचार चालू आहेत.घटनेच्या दिवशी नमूद आरोपीतांनी आदित्य प्रधान व आनंद ढोले यांच्यावर चाकूने हल्ला केला तेव्हा पोलीस घटनास्थळीच होते.
आणि आरोपी पोलीसांच्या शेजारी. सदर घटनेत दोन्ही आरोपींना रुग्णालयात पोलीसा ऐवजी भांबवलेल्या घरच्या नातलगांनीच रिक्षा द्वारे नेले. हा प्रसंग जखमीचे नातेवाईक ओरडून पोलीसांना सांगत होते. त्याचा मनस्ताप ,जखमीचा मृत्यू आणि दुसरा रुग्ण मृत्यूची झुंज देत असताना गायत्री नगर मध्ये जनक्षोभ उसळला काही अनुचित घटनाही घडल्या याची चौकशी न करता आणि मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी करणाऱ्या गंभीर जखमी तरुणाचे भाऊ अँड विष्णू ढोले यास जबाबदार धरून पोलीसांच्या अपयशाचे खापर आणि राजकीय दबाव पोलीसांवर येत असल्याने गायत्रीनगरची उद्भवलेली परिस्थिती शांत करण्यासाठी पोलीसांनी परभणी येथील रुग्णालयात जाणाऱ्या अँड विष्णू ढोले यास ताब्यात घेऊन अफलातून शकल लढवत त्याच्यावर १०९/१व शस्त्र वापर असे खोटे गंभीर गुन्हे दाखल करून तुरुंगात घातले. मुळात हा प्रकारच राजकीय दबावा आणि पोलीसांना घटना हाताळण्यात आलेले अपयश हे आहे. असे म्हणत पोलीसांनी खून प्रकरणात आरोपी असलेल्या दोन महिलासह इतर पाच जणावर गुन्हा दाखल केला. आज आठवड्यानंतर ही पोलीस मुख्य आरोपी आणि दोन महिलांना उचलण्यास असमर्थ ठरले आहेत.
असा आरोप करत पती अँड विष्णू ढोले यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि मुख्य आरोपीस दोन दिवसात ताब्यात घेतले नाही तर शांततेच्या मार्गाने समाजाला सोबत घेऊन आंदोलन करण्याचे मनोगत व्यक्त केले आहे. पत्रकारांनी अँड ढोले यांनी पोलीसांचे वाहन आडवुन खुणातील आरोपीवर तलवार उगारली असा प्रश्न केल्यावर अँड सुनीता ढोले यांनी मुळात ही घटना दिवसा १२नंतर उपजिल्हा रुग्णालय या गजबजलेल्या परिसरात झाली तीच खोटी असल्याचे स्पष्ट करत याचे कोणतेच सक्षम पुरावे पोलीसाकडे नाहीत. असे म्हटले अँड विष्णू ढोले हद्दपार आहेत.यावर छेडले असता अँड विष्णू ढोले यांच्यावर हद्दपार करण्यासाठी लागणारा एकही गुन्हा दाखल नाही शिवाय दाखल प्रत्येक गुन्ह्याचे पोलीसच फिर्यादी कसे असा प्रश्न अँड सुनिता ढोले यांनी पत्रकारांना विचारला.गायत्री नगर सारख्या ठिकाणी झालेल्या चाकू हल्ल्यात प्रधान कुटुंबीयांने आपला मुलगा गमावला आहे.त्यांचे साधे सांत्वन करण्यासाठी एकही राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रातील कोणीही फिरकले नाही. अशी खंत ही अँड सुनिता ढोले यांनी व्यक्त केली आहे.











