पाथरी (प्रतिनिधी) : जगाला शांतता, करुणा व मानवतेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त पाथरी शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टी. एम. शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. एम. शेळके होते.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश उजागरे, सा. का. शामराव ढवळे, बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे, बौद्धाचार्य दादाराव ब्रम्हराक्षे, बौद्धाचार्य डी. एल. भालेराव, माजी सभापती डॉ. घोक्षे, नगरसेवक अनिल ढवळे, अतिन फुलवरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिनकर कदम, धम्मपाल उघडे, धावरे, पत्रकार राजकुमार गायकवाड, भास्कर पंडित तसेच ज्येष्ठ नेते दिलीप ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण ज्येष्ठ नेते प्रकाश उजागरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे व दादाराव ब्रम्हराक्षे यांनी बुद्ध वंदना घेतली. धम्मपाल उघडे व धावरे यांनी बुद्ध, धम्म व संघ यांचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आवडाजी ढवळे यांनी केले. आभार प्रदर्शन दादाराव ब्रम्हराक्षे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर शेळके, बन्सीधर धनले, नागसेन मनेरे, पद्मिनीबाई ढवळे, श्रीरंग वाकडे, जीवाजी ढवळे, राजू लांडगे, रवि डंबाळे, संभाजी ढवळे, जाधव (बँक व्यवस्थापक), विमलबाई ढवळे, सोनाबाई लांडगे, मंदाबाई ढवळे, जयश्री ढवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसर बुद्धमय वातावरणाने भारावून गेला.






