देवीभोयरे (प्रतिनिधी) : आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी
यंदाच्या निकालात अनुजा संतोष जानकर हिने ६६.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तेजस्विनी सागर बेलोटे हिने ६६.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर श्रावणी अशोक थोरात हिने ६३.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांसाठी वर्षभर उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात वर्षभर जादा तास, नियमित सराव चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन तसेच पालकांशी सातत्यपूर्ण संवाद अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
या यशामागे प्राचार्य राजेंद्र वाघ यांच्यासह परंडवाल सर, म्हस्के सर, वैद्य मॅडम, हासे सर, बेलोटे सर, औटी मॅडम, गाडीलकर सर आणि शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व स्तरांतून अभिनंदन
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत असून विद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.











