करमाळा : येथील महात्मा गांधी शाळेत 2002 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने आनंदाचे व भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
या स्नेहसंमेलनात संजय अवचर, विनय देवरे, समाधान लोढे, कुशलदिप गायकवाड, माधव जाधव, निलेश शाकुंड, रावसाहेब शाकुंड, विजय जाधव, श्रीकांत जाधव, ईश्वर शेख, भाऊसाहेब थोरात, किशोर भेडगे, अरविंद पवार, सुनील वाघमारे, सुधाकर शिंदे, संदीप पुजारी, संजय कोकाटे, अनुप गाढवे, रामदास वाघमारे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच अमृता नरवडे, विद्या शिंदे, सारिका पाटील, शरयू दिवाण, वैष्णवी परदेशी, आश्विनी धोंडगे, प्राची मोरे, पल्लवी सोनवणे, प्रज्ञा कुटे, वर्षा धनवणकर, आदित्य यादव, स्वाती बनकर, विशाल परदेशी, सुहेल यादव, प्रियंका बनसोडे, आरती शेळके, सुभाषना बेट्रे, श्रद्धा आस्मा, सोनाली कोने, मानसी भोईर, संगीता रोडगे व शैलिनी मस्कर आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमात जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला. सर्वांनी आपापले अनुभव, गप्पा-गोष्टी आणि शालेय जीवनातील संस्मरणीय क्षण शेअर केले. विविध उपक्रमांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी भविष्यातही असे स्नेहमेळावे नियमित आयोजित करण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यामुळे जुनी मैत्री अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








