भडगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, भडगाव येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विज्ञान (सायन्स) शाखेत कु. कीर्ती माळी हिने ७१.१७% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. विज्ञान शाखेत कु. अश्विनी शिंदे हिने द्वितीय तर कु. श्रद्धा पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेत कु. संध्या खैरे हिने प्रथम, तर कु. कांचन सोनवणे हिने द्वितीय क्रमांक मिळवला असून कला शाखेचा निकाल ६३.६३% लागला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. एकनाथ गरबड महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. प्राचार्य एस. पी. रोकडे, पर्यवेक्षक एस. पी. बोरसे व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले.
या यशामुळे भडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थिनींवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











