माळशिरस (प्रतिनिधी)
सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम व पुडुचेरी या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
अकलूजमधील सदाभाऊ चौक येथे कमळाचे झेंडे फडकवत व घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. ढोल-ताशे आणि हलग्यांच्या गजरात हा जल्लोष उत्साहात पार पडला.
यावेळी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
सदाभाऊ चौक परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाची ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.










