तेल्हारा (प्रतिनिधी) – तेल्हारा येथील मातोश्री क्रीडा, युवक कल्याण, व्यायाम व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुकुल ज्ञानपीठने इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत यंदाही १००% निकालाची परंपरा कायम ठेवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या परीक्षेसाठी एकूण ६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी २ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून १८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी
- कु. जानवी निलेश देशमुख – ८१.००% (प्रथम)
- रोमित उल्हासराव देशमुख – ७७.१७%
- कु. गायत्री दिलिप गावंडे – ७४.६७%
- कु. गौरी गोपाल भारंबे – ७४.००%
- गजानन नितीन मोरे – ७३.३३%
- कु. जयश्री देवीदास इंगळे – ७३.३३%
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. कमल मदनलालजी माहेश्वरी, कोषाध्यक्ष सौ. अर्चना कमल माहेश्वरी, मुख्याध्यापक श्री. किशोर सोपान देठे, सौ. वर्षा अशोक पारस्कर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.








